६. जनपदे आणि महाजनपदे

६.१ जनपदे :

६.२ महाजनपदे :

६.३ मगध साम्राज्याचा उदय :

करून पहा :

भारताच्या नकाशा आराखड्यात सोळा महाजनपदांची नावे लिहा.

६.१ जनपदे :

साधारणपणे इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या 'अश्मक' या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यांतील काही जनपदांमध्ये राजेशाही होती. काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची 'गणपरिषद' असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत, त्या सभागृहास 'संथागार' असे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक म जनपदाची स्वतंत्र नाणी होती.

महाजनपदे :

कोसल :

• कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता.

या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती.

श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती.

गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते.

कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.

• कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.

वत्स :

• वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील झाला होता. प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात

• कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय.

• हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.

● कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते.

• राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.

• राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले.

अवंती :

● मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जयिनी (उज्जैन) हे नगर ही त्याची राजधानी होती.

• उज्जयिनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.

• अवंतीचा राजा प्रयोत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.

• अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले.

मगध :

• बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मध महाजनपद होते.

राजगृह (राजगीर) ही त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैदय बिंबिसाराच्या दरबारात होता.

बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते, की इ.स.पू. ६व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये सोळा महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांतही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली.

६.३ मगध साम्राज्याचा उदय :

बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगिती म्हणजेच परिषद झाली.

अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हे पाटलिपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलिपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे.

अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले.

मगध साम्राज्याचे नंद राजे: इ.स.पू. ३६४ ते इ.स.पू. ३२४ या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली.

नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलिपुत्र जिंकून घेतले, नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला.

पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती करून घेऊ. तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊ. 

माहीत आहे का तुम्हांला ?

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे :

(१) काशी (बनारस), (२) कोसल (लखनौ), (३) मल्ल (गोरखपूर) (४) वत्स (अलाहाबाद) (५) चेदि (कानपूर), (६) कुरु (दिल्ली), (७) पांचाल (रोहिलखंड), (८) मत्स्य (जयपूर), (९) शूरसेन (मथुरा), (१०) अश्मक (औरंगाबाद महाराष्ट्र), (११) अवंती (उज्जैन), (१२) अंग (चंपा-पूर्व बिहार), (१३) मगध (दक्षिण-बिहार), (१४) वृज्जी (उत्तर बिहार), (१५) गांधार (पेशावर), (१६) कंबोज (गांधारजवळ)

Previous Post Next Post