विज्ञान हे वरदान | राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण | विज्ञान दिन माहिती | Nationa Science Day | Science As Boom

विज्ञानातूनी जन्म आमुचा,

अन रस्ता रहस्यांचा ।

मार्ग तो प्रगतीचा,

आनंददायी चमत्काराचा ।।

अशी विज्ञानाची महती आहे. पण आपणास पावलोपावली पडणारा प्रश्न म्हणजे "विज्ञान शाप की वरदान?" विज्ञानाने पुरविलेल्या अनेक सुविधा आपण उपभोगतो आणि त्याचवेळी वैज्ञानिक शोधातून ओढवलेले जीवघेणे अपघातही पाहतो. या सर्व प्रसंगांतूनच हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्या सर्व गरजा पुरवणारी, विविध रहस्य उलगडणारी चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान हे विज्ञान म्हणजे मानवाला लाभलेला एक परीस आहे. आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाने जादूच्या कांडीप्रमाणे दूर केला. या विज्ञानाने मानवी जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. चाकाच्या शोधानंतर मानवी जीवनाला गती मिळाली. मानवाच्या प्रत्येक गरजा पुरवणारी यंत्रे विज्ञानाने दिली. मानवाच्या जीवनाला स्थैर्य लाभले. अनेक कठीण कामे सुलभ झाली. वेळ लांबवणारी कामे क्षणार्धात होऊन वेळेची बचत होऊ लागली.

अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने ज्ञानाच्या शाखा रूंदावल्या. संगणकीकरणाच्या या एकविसाव्या शतकात दळणवळण व माहिती तंत्रज्ञान अफाट विस्तारले आहे. एका क्लिकवर आपल्याला जगभराची माहिती मिळते. सातासमुद्रापलिकडे असणारे जग जवळ आले आहे. मोबाइल तर संदेदशवहनाची खाणच आहे. मोठ्या प्रमाणावर संदेशवहनामुळे कल्पनांची देवाणघेवाण होऊन जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगिकीकरण अशा विविध क्षेत्रात विलक्षण क्रांती घडून आली आहे. अंधश्रद्धेपासून अलिप्त असा नवा समाज निर्माण झाला. मानवाने भूमीप्रमाणे सागरावर आणि अंतरिक्षावरही स्वामित्त्व मिळवले आहे.

मात्र, विज्ञान फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकते, हाव नाही. विज्ञानाने शोधलेल्या यंत्रांनी कष्टाचे महत्त्व नाहीसे झाले व माणूस आळशी बनला. स्वयंपाकापासून खेळापर्यंत उद्योगापासून प्रगतीपर्यंत सर्व गोष्टी जलद व सुलभ रीतीने करण्याचे तंत्र विज्ञानाने दिले. पण आपण मात्र शरीरासाठी आवश्यक व्यायाम, अन्नाचा ताळमेळ निसर्गाचे सान्निध्य सर्व काही हरवून बसलो. जलद जीवनशैलीत आपण आपली माणुसकीच विसरलो.

निसर्गाचा तर मानवाने मोठ्या प्रमाणावर छळ केला. निसर्गाने दिलेल्या अमृतरूपी औद्योगिक क्रांतीचे रूपांतर मानवाने प्रदूषणरूपी महाभयंकर राक्षसात केले. वनांची व वन्यजीवांची कत्तल करून निसर्गाचा समतोल बिघडवून टाकला. आपल्या संरक्षणासाठी मिळालेल्या अणुशक्तीचा वापर मानवाने क्रूरपणे महायुद्धात केला. लहान लहान कारणांसाठी आपण नैसर्गिक साधनसंपत्ती व ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय करतो. ज्या सोनोग्राफीच्या क्रांतिकारी शोधानंतर मोठ्या प्रमाणावर रोगांवर प्रतिबंध मिळविता आला, त्या तंत्राचा वापर स्त्रीभूणहत्येसारख्या अमानुष कृत्यांमध्ये केला जात आहे.

अधिराज्य गाजवणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्यासाठी विज्ञानाचा स्वार्थीपणाने वापर होत आहे. याला मानवाची बदललेली मानसिकता, हिंसकपणा व स्वार्थ कारणीभूत आहे. विज्ञानाने माणसाच्या प्रत्येक गरजेला साथ दिली व देत राहणार आहे. त्यामुळे विज्ञान हे पूर्णत: वरदानच आहे. त्याला शाप म्हणणारी व शाप बनवणारी मानवाची वृत्ती आहे.

विज्ञानाला घेऊन संगे

फेडा निसर्ग ऋण,

भविष्याची कास धरून

फक्त ते वापरा जपून l

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन

↪️  नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय

↪️  विज्ञान-म्हणजे-काय?

↪️  विज्ञान-हे-वरदानच

↪️  विज्ञानाची-वैशिष्ट्ये

↪️  MP3-विज्ञान-गीत-डाऊनलोड

🔖 मराठी राजभाषा दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन

↪️  कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय

↪️  कुसुमाग्रज-जीवन-प्रवास

↪️  कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती

↪️  जन्म-मराठी-भाषेचा

↪️  मराठीची-बोलू-कौतुके

↪️  माझी-मातृभाषा-मराठी

↪️  मराठी-आमुची-मायबोली

↪️  मराठी-भाषा-गीत-डाऊनलोड

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post