सन्माननीय व्यासपीठ व विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतच असतो. परंतु आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजेच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभरात नेहमीपेक्षा अतिउत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करत आहोत.
१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली. सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, "मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक' अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. लालकिल्ल्यावर 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले.
मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला ? दीडशे वर्षे राज्य कसे केले ? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले.
आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू, उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी ' करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या ' आझाद हिंद सेने 'नेही अभूतपूर्व कामगिरी केली.
विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासा लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या. रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया ! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत.
मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.
देशहिताचे विचार अंगी बाळगण्याची व देशभक्ती, राष्ट्रहित प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या हृदयी जोपासण्याची. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो / देते.. धन्यवाद !!
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!
Disclaimer
वरील माहिती विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
----------------------------
----------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
----------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
----------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻