* शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
* मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन येईल सांगता येत नाही.
* आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
* एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
* परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.
* जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात , त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
* पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
* मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
* दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
* आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
* जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
* पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
* आपण परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा परिस्थिती आपल्याला शरण आली पाहिजे.
* अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
* मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
* नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
* अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
* सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
* शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
* गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.* पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !* स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.* अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
* चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
* अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप.
* क्रोध माणसाला पशू बनवतो.
* आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
* चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
* केवड्याला फळ येत नसले तरीही त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
* समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
* भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
* दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला शिका.
* निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.
* खरे तेच बोला, उदात्त तेच लिहा, उपयोगाचे तेच शिका आणि देशहिताचे तेच करा.
* क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. / जशी दृष्टी तशी सृष्टी.
* प्रेम लाभे प्रेमळांना , त्याग ही त्याची कसोटी. / सत्तेपूढे शहाणपण चालत नाही.
* लक्ष्मी सत्पुरूषाच्या घरी त्याच्या गृहिणीच्या स्वरूपात नांदत असते.
* चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या मोडू नका.
* निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे. / कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.
* माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
* आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.
* सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.
* बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.
* संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.
* हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे, अहिंसा हे सबलांचे.
* परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.
* शहाणा माणूस चुका विसरतो , पण त्याची कारणे नाही.
* कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
* प्रसिध्दी ही कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.
* मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ.
* ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्ही तर ज्ञान तुमचेच रक्षण करते.
* भरलेला खिसा माणसाला दुनिया , रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो.
* स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
* ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
* चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
* शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
* विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
* स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
* जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
* मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली समजावे.
* बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
* एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
* डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड तर माणसं तुटत नाहीत.
* वाचलेली पुस्तकं आणि जीवनात भेटलेली माणसं माणसाला हुशार बनवतात.
* आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
* शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे, हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
* स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
* कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
* स्वतःची तुलना इतरांबरोबर म्हणजे तुम्ही स्वतःचा अपमान करणे होय.
* विश्वास हा खोडरबर सारखा असतो , प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
* अडचणीत असतांना दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे.
* मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
* कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
* न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
* कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही व यशस्वी होणारे कारण सांगत नाही.
* नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही , तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
* विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
* कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
* अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
* दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.
* आपण काहीही करू शकतो पण , सर्वकाही नाही करू शकत.
* दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
* अपयश म्हणजे संकट नव्हे , योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
* ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही , स्वस्थ राहण्याने मात्र होते.
* दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
* जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
* सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते. / असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
* श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
* राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
* संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
* उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे , तो म्हणजे रात्र होय.
* उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
* जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
* ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
* गौरव हा पडण्यात नाही , पडून उठण्यात आहे.
* तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.
* इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
* अनेक वेळा चांगले क्षण / आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.
* शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
* संकट तुमच्यातली शक्ती , जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
* संघर्षाशिवाय कधीच , काहीच नवे निर्माण झाले नाही.
* हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
* अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
* अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
* स्वतःची भाषा , स्वतःचे विचार आणि स्वतःवर सदैव विश्वास ठेवा.
* जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
* जोपर्यंत अंतःकरणात जिद्द आहे , तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे.
* विचार निरोगी असले की सुविचार सुचतात.
* सुविचार जीवनात दिपस्तंभाचे कार्य करतात.
* जो गुरुला वंदन करत नाही , त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
* झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
* माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
* क्रांती हळूहळू घडते , एका क्षणात नाही.
* सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
* बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
* मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
* तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
* खिडकी म्हणजे आकाश नसतं. / कविता म्हणजे भावनांचं चित्र होय.
* जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
* वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
* भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
* संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
* तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
* ज्याच्यामधे मानवता आहे , तोच खरा मानव आहे.
* अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. / तुलना करावी पण अवहेलना करू नये.
* समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
* आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
* मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
* चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
* व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
* आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
* तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
* अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
* विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. / मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
* आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
* आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
* प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही. / काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
* तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
* सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
* लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
* चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
* उक्ती आणि कृती यात भेद असू नये.
* चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
* आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
* उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
* पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
* अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
* मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
* संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
* रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय म्हणजेच मौन होय.
* अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. / अंथरूण बघून पाय पसरा.
* कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.
* अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. / मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच.
* चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.
* कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
* आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
* ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
* जे झालं त्याचा विचार करू नये , जे होणार आहे त्याचा विचार करा.
* रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
* लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
* जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
* पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
* आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
* गुणांचं कौतुक उशीरा होतं , पण होत हे मात्र नक्की.
* कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
* स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता.
* ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
* जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
* प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
* श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
* आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र.
* स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
* अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
* हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
* आयुष्यात असे काही मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
* बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
* कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
* टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण मिळत नाही.
* यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
* दुसऱ्याच अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी.
* स्वातंत्र्य म्हणजे संयम , स्वैराचार नव्हे. / शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
* आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
* जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
* तन्मयता नसेल तर , विद्वत्ता व्यर्थ आहे.
* काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
* आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
* एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो.
* उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
* दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
* माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
* प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
* व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
* काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
* दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका , वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
* शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
* जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
* दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
* शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही , तो स्वतःहून शिकतो.
* जग हे कायद्याच्या भितीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
* परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
* गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
* स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
* प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
* आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
* जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
* सद्गुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
* उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
* लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
* मोहाचा पहिला क्षण हीच पापाची पहिली पायरी असते
* जीवन नेहमीच अपूर्ण असते व ते त्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
* सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
* जगात सारी सोंगे करता येतात , पण पैशाच सोंग करता येत नाही.
* संकटं टाळणं माणसाच्या हाती नसलं तरी सामना करणं त्याच्या हातात असतं.
* जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
* क्रांती तलवारीने घडत नाही तर तत्वाने घडत असते.
* जो गुरू असेल , तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल , तो गुरू नसेल.
* जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्याला सांभाळत न्यावं लागतं.
* प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करा.
* स्वातंत्र्य म्हणजे संयम असून स्वैराचार नव्हे.
* आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
* जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
* जीवनात तन्मयता व संयम नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.
* आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करावा.
* दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
* केवळ ज्ञान असून उपयोग नाही , ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
* बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
* चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
* तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
* दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
* स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
* त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या
* जगू शकलात तर चंदनासारखे जगा , स्वत: झीजा आणि इतरांना गंध दया.
* दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
* पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
* उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
* जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
* मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
* आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
* बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
* तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
* गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
* स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
* प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
* आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
* जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
* सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
* उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
* लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
* मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
* जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
* सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
* जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
* संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात.
* क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
* जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
* जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
* जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
* वैभव त्यागात असते, संचयात नाही.
* तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
* खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
* मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
* पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
* ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
* टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
* प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
* मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
* भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
* वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
* त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
* शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
* कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
* बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
* विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.
* शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.
* जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.
* न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.
* भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी
* स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
* कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती !
* साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.
* जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.
* दुर्बल मनाचा मनुष्य कधीच हुतात्म होऊ शकत नाही.
* अन्न हे पूर्णब्रह्म आहे ; त्याचा अनादर करू नका.
* ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते ; तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा.
* डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
* काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.
* प्रफ़ुल्लता हेच चेहऱ्याचे खरे सौदर्य . औदासिन्य चेहऱ्याला कुरूप बनवते .
* अंतःस्थपणे जीवन संपन्न करते तेच खरे मनोरंजन .
* शारीरिक सौदर्य़ कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौदर्य़ कधीच नष्ट होत नाही
* ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय .
* जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या
* केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
* सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.
* रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.
* सहित्य ही उपासना आहे, वासना नाही. ती वासना झाल्यास साहित्य अवनत होते .
* वाड्मय हे देशाच्या घटनेचे आणि प्रगतीचे एक प्रभावशाली अस्त्र आहे .
* जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ
* निढळाचा घाम घाळून श्रमतो त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते.
* एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.
* माणासाला माणसाजवळ आणणे हीच खरी प्रगती.
* समताधिष्ठीत समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्रत्येकाला प्रत्येकाला आहे
* जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
* कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
* इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
* “ भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही ”
* माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.
* जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.
* आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
* यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे.
* माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा.
* डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
* जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात.
* आपण का पडतो ? परत उठून उभे राहण्यासाठी.
* आपण का अयशस्वी होतो ? परत यशस्वी होण्यासाठी.
* मी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
* पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल.
* जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.
* एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.
* पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात.
* आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते.
* प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते.
* जीवनात दुःखच नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
संकलन : गिरीष दारुंटे , मनमाड
व्ही. एन. नाईक हायस्कूल , मनमाड ( नाशिक )