मूर्च्छा का येते ?

रामायणाच्या गोष्टींमध्ये लक्ष्मणाला मूर्छा आली ती गोष्ट तुम्हाला आठवत असेल. मग हनुमानाने औषधी बनस्पतीसाठी डोंगर उचलून आणला वगैरे...

व्यक्ती वेशुद्ध किंवा मूर्च्छित होण्याची खूप कारणे आहेत. दारूचे जास्त सेवन केल्यास मूर्च्छा येते. डोक्यावर जोराचा मार लागला तरी व्यक्ती बेशुद्ध पडते. अचानक बसलेल्या मानसिक धक्क्यामुळेही काही जण बेशुद्ध पडतात. विषवाधामधुमेहउष्माघातमेंदूतील रक्तस्रावहृदयविकाराचा झटका आणि मिरगी यांसारख्या कारणांमुळेही व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. अशक्तपणा किंवा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यामुळेही चक्कर येते आणि व्यक्तीला मूर्छा येऊ शकते. जखमांमुळे खूप रक्तस्त्राव झाला तरी व्यक्ती बेशुद्ध होते.

तुमच्या एक लक्षात आले असेल कीवेशुद्ध पडण्याची अनेक कारणे म्हणजे गंभीर रोग होत. त्यामुळे घरच्या घरी प्रयत्न करून वेळ घालवण्यापेक्षा रुग्णाला तात्काळ दवाखान्यात न्यावे हेच योग्य होय. काही पथ्ये मात्र पाळावीत रुग्णाला वेशुद्धावस्थेत काहीही खायला किंवा प्यायला देऊ नये. अन्यथा पाणी वा अन्न फुफ्फुसात जाऊन न्यूमोनिया होऊ शकतो. रुग्णाची मान ताणून एका बाजूला वळवावी. त्याचा जबडा आणि जीभ पुढे ओढावेत. त्याच्या तोंडात काही असेल तर ते बाहेर काढावे. श्वसन चालू नसेलतर आपल्या तोंडाने त्याच्या तोंडात हवा सोडावी. असे कृत्रिम श्वसन देण्यासाठी त्याच्या तोंडात हवा सोडताना त्याचे नाक दाबावे. त्याच्या तोंडात हवा सोडल्यानंतर आपले तोंड बाजूला घ्यावे. मिनिटातून १६ ते २० वेळा अशा प्रकारे त्याच्या तोंडात हवा सोडावी. लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करावेम्हणजे योग्य उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचतील.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत  डॉजगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...  

أحدث أقدم