महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
यशवंतराव बळवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३ कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुध्दा होते.
यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. "युगांतर", "सह्याद्रीचे वारे", "कृष्णाकाठ", "ऋणानुबंध" ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
जन्म : मार्च १२, इ.स. १९१३ देवराष्ट्रे जि. सातारा महाराष्ट्र, भारत
मृत्यू : नोव्हेंबर २५, इ.स. १९८४ दिल्ली
राष्ट्रीयत्व : भारतीय, राजकीय
पक्ष : अखिल भारतीय काँग्रेस
अपत्ये : नाही
निवास : कराड
शिक्षण : टिळक हायस्कूल, कराड,
व्यवसाय : राजनीतिज्ञ
धर्म : हिंदु मराठा
जीवन :
इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या.
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार :
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.
यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात.
योजना :
• पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) - व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)
• राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
• कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
• १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
• 'मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)
• राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
• मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
• तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना. धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.
ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.
मृत्यू :
यशवंतराव चव्हाण हे उत्तम राजकारणी नेते होते. यशवंतराव चव्हाण यांनी लहानपणापासून गरीबी बघितली होती. यशवंतराव चव्हाण हे स्वतः शून्यातून वर आले होते. आणि शून्यातून वर येण म्हणजे गरीबी, संघर्ष, संकटं, वेगवेगळ्या अडचणी, कष्ट, महिनत या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं हे खूप अचूकरित्या त्यांना माहीत होतं. त्यामुळे ज्या वेळी ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांना समाजाच्या अडचणी माहीत होत्या. आपल्या समाजातील दारिद्र्य मिटवून टाकणं हे त्यांचं एक स्वप्नच होतं. आपल्या महाराष्ट्राला व देशाला कसं पुढे नेता येईल याच गोष्टींचा त्यांनी नेहमी विचार केला. यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व फार वेगळे होते.
ते प्रगत विचारांचे होते. महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर चढवन्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग आर्थिक विकास हा सगळीकडे समान झाला पाहिजे असे यशवंतराव चव्हाण यांचे मत होते. आणि त्यानुसार त्यांनी ते प्रत्यक्षात देखील उतरवलं.
अगदी शून्यातून यशवंतराव चव्हाण यांनी आपलं नाव आपल्या कामगिरीच्या जोरावर उभं केलं होतं. आपण केलेल्या कष्टाची जाण त्यांना होती म्हणून त्यांना मिळाल्या मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी नेहमीच आदर केला. त्या पदाचा गैरवापर त्यांनी कधीच होऊ दिला नाही. २५ नोव्हेंबर १९८४ या दिवशी यशवंतराव चव्हाण यांना हृदयविकाराचा झटका आला.
दिल्लीमध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेली मेहनत फळाला आली. परंतु आज जी महाराष्ट्राची स्थिती आहेत त्यानुसार पुन्हा यशवंतराव चव्हाण यांच्या सारखं व्यक्तिमत्व घडावं अशी इच्छा संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या कर्तबगारीने त्यांच्या प्रगत विचारांनी महाराष्ट्राला यशाच्या वाटेवर सोडलं होतं.
यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी पुस्तके :
आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के. जी. कदम)
NTE यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
यशस्वी यशवंतराव (रा. द. गुरव)
यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (परमार रंजन)
आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
यशवंतराव बळवंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
Chavan, The Man of Crisis (B.B. Kala)
Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
Man of Crisis (Baburao Kale)
YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा :
आपले नवे मुंबई राज्य (इ.स. १९५७)
ऋणानुबंध (आत्मचरित्रपर लेख) (१९७५)
कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४). हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे.
भूमिका (१९७९)
महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
विदेश दर्शन - ( यशवंतराव यांनी परदेशाहून आपल्या पत्नी सौ. वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) (१९८८)
असे होते कर्मवीर... भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख -१९६८)
उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका - १९६०)
यशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था :
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे) ऊंटे
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन् नाथ भोसले रोड, मुंबई
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी (पुणे)
यशवंतराव चव्हाणांचे पुतळे :
कऱ्हाड, पिंपरी (पुणे), फलटण, सातारा, संसद भवनाच्या लॉबीत (नवी दिल्ली)
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻